Online Apply Aatmanirbhar Bharat Rojgar Yojana 2021-Allpmmodiyojana

Aatmanirbhar Bharat Rozgar Yojana Pdf | Pradhanmantri Aatmnirbhar Bharat Rozgar Yojana | Aatmanirbhar Bharat Rojgar Yojana Notification | Aatmanirbhar Bharat rozgar yojana upsc | aatm nirbhar bharat rojgar yojana | eligibility criteria for establishments | ministry of labour employment | creation of new employment opportunities | epfindia.gov.in

Aatmanirbhar Bharat Rojgar Yojana :

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना हि नवीन रोजगार निर्मितीसाठी नियोक्त्यांना प्रोत्साहन देणारी योजना आहे. १२ नोव्हेंबर २०२० रोजी आपल्या देशाच्या श्रीमती निर्मला सीतारामन यांनी देशातील तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी Aatmanirbhar Bharat Rojgar Yojana सुरु करण्यात अली. गेल्यावर्षी म्हणजे आपल्याकडे जेव्हा कोरोना आला त्या वेळेस सरकारने आत्मनिर्भर भारत रोजगार योजना सुरु केली होती. कोरोनातून बाहेर निघाल्यावर रोजगाराची संधी वाढवणे हा या योजनेमागचा उद्देश आहे. ही योजना देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यात महत्वाची भूमिका बजावेल. आणि आत्मनिर्भर भारत रोजगार योजना ३० जून पासून २०२१ कार्यान्वित असेल.

Aatmanirbhar Bharat Rojgar Yojana अंतर्गत लाभार्त्याना रोजगाराच्या संधी देण्यासाठी अनेक पावले केंद्र सरकारकडून उचलली जात आहे. प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत रोजगार योजना संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना रोजगार देण्यासाठी सुरु केली आहे. तुम्हाला आत्मनिर्भर रोजगार योजनेचा लाभ घ्यायचा असेल हा लेख शेवटपर्यंत वाचावा अशी विनंती.या लेखात तुम्हाला आत्मनिर्भर भारत रोजगार योजने संबंधित सर्व माहिती सांगणार आहोत आणि ऑनलाईन अर्ज कस करायचा, कोणती आवश्यक ती कागदपत्र आणि पात्रता काय आहे हे जाणून घेणार आहोत.

Aatmanirbhar Bharat Rojgar Yojana

आत्मनिर्भर भारत योजनेत नोंदणीसाठी अंतिम तारखेला मुदत वाढ देण्यात आली आहे. यासाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२१ होती ती वाढवून ३१ मार्च २०२२ झाली आहे. यामाध्यमातून ७१.८ लाख नागरिकांना रोजगार प्राप्त होईल.२१.४२ लाख लाभार्त्याना आतापर्यंत ९०२ कोटी रुपयांचा लाभ झाला आहे. आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरवात झाली आहे. याअंतर्गत १२ नव्या योजना सुरु झाल्या आहे. यात नोकरीपासून व्यवसायापर्यंत सर्व क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होईल.

या योजनेमध्ये २७.१ लाख कोटीची गुतंवणूक करण्यात अली आहे. यामाध्यमातून ७१.८ लाख नोकऱ्या निर्माण होतील.असे म्हटले जात आहे. हि रक्कम देशाच्या जीडीपीच्या १३ टक्के आहे. तसेच या योजनेसाठी लागणार खर्च वाढून २२ हजार ९८ कोटी रुपये करण्यात आला आहे. ज्या कंपन्या EPFO जोडल्या गेल्या आहे आणि ज्यांचा पगार प्रतिमहिना १५००० आहे. अशा व्यक्तींनाच फायदा होणार आहे.

योजना आत्मनिर्भर भारत रोजगार योजना
योजनेचा प्रकार केंद्र सरकार
लाभार्थी नवीन कर्मचारी आणि पात्र कर्मचारी
कोणी सुरु केली निर्मला सीतारमण
सुरवात१२/११/२०२०
योजनेचा कालावधी २ वर्षे
अधिकृत वेबसाइट https://www.epfindia.gov.in/site_en/index.php
हेल्पलाईन नंबर १८००११८००५

EPFO अधिकृत वेबसाईड वर जाण्यासाठी इथे क्लीक करा

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना उद्देश

Aatmanirbhar Bharat Rojgar Yojana सुरु करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे कोरोना च्या साथीच्या आजारामुळे गमावलेल्या लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे

अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी २८ जून २०२१ रोजी आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची व्याप्ती ३० मार्च २०२२ पर्यंत वाढवली आहे. या योजनेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्यासाठी नोकर्यांना प्रोसाहित केले जाईल. कर्मचारी व मालकाचे भविष्य निर्वाह निधी जमा करून हि सरकारद्वारे दिली जाईल.

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना पात्रता :

  • EPFO नोंदणीकृत असलेल्या म्हणजेच सप्टेंबर २०२० पर्यंत नवीन कर्मचारी भरती केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
  • जर संदर्भ आधार ५० कर्मचारी किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि त्यांनी कमीत कमी २ नवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असलं तर त्या लाभार्त्याना योजनेचा लाभ घेता येईल.
  • जर संदर्भ आधार ५० कर्मचारी किंवा त्याहून अधिक असेल तर किमान ५ नवीन कर्मचारी नियुक्त केल्यास आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा लाभ घेता येईल.

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना आवश्यक कागदपत्रे :

  • EPFO अंतर्गत कर्मचारी नोंदणी असलेले प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • कर्मचाऱ्यांना पगार हा दरमहा १५००० किंवा त्यापेक्षा कमी

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना लाभार्थी ( Beneficiaries Of Aatmanirbhar Bharat Rojgar Yojana)

  • देशातील सर्व गरीब नागरिक
  • श्रम करणारे
  • प्रवासी कामगार
  • पशुपालन करणारे
  • मच्छिमार
  • शेतकरी
  • संघटित आणि असंघटित क्षेत्रातील व्यक्ती
  • भाडेकरी शेतकरी
  • कुटीर उद्योग
  • लघु उद्योग
  • मध्यमवर्गीय उद्योग

आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेसाठी नोंदणी कशी करायची?

Employers साठी नोंदणी

  • प्रथम EPFO च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.
  • होमपेज वर तुम्हाला services या टॅब वर क्लीक करावे लागेल. नंतर तुम्हाला For Employers वर क्लिक केले कि Services मध्ये Online Registration For Establishment या लिंक वर क्लिक केले हे पेज उघडेल.
Aatmanirbhar Bharat Rojgar Yojana Registration
Aatmanirbhar Bharat Rojgar Yojana Registration
  • या पेज वर sign up वर क्लिक केले कि असेल पेज उघडेल.
Aatmanirbhar Bharat Rojgar Yojana
Aatmanirbhar Bharat Rojgar Yojana Registration
  • नंतर पुढील पेज वर नोंदणी अर्ज उघडेल त्या अर्ज मध्ये तुम्हाल विचारलेली संपूर्ण माहिती बरोबर भरावी लागेल. यानंतर तुम्ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.

Employee साठी नोंदणी

  • प्रथम EPFO च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.
  • होमपेज वर तुम्हाला सर्विसेस या टॅबवर क्लिक केले कि Employee वर क्लिक केले कि register हे पेज उघडते पण अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून,२०२१ असल्यामुळे ते पेज आता उघडत नाही.

योजनेची वैधता:

ही योजना १ ऑक्टोबर २०२० पासून सुरू झाली आहे आणि ३० जून २०२१ पर्यंत पात्र कर्मचारी आणि नवीन कर्मचार्‍यांच्या नोंदणीसाठी खुली राहील.
केंद्र सरकारने ३०/०६/२०२१ रोजी जे पात्र आहे त्याच्यासाठी नोंदणीची अंतिम तारीख वाढवण्यास मान्यता दिली आहे. ३०/०६/२०२१ ते ३१/०३/२०२२. नवीन कर्मचाऱ्याच्या नोंदणीच्या तारखेपासून चोवीस महिन्यांच्या कालावधीसाठी लाभ उपलब्ध असेल. ( ३१/०३/२०२४ नंतर लाभ मिळणार नाही ) नवीन कर्मचाऱ्यांना नोंदणीच्या तारखेपासून EPF योगदानाच्या रूपात २४ महिने पगार मिळणार आहे.

इतर योजना

Delhi Shramik Mitra Yojana

Pradhanmantri Fasal Bima yojana 

FAQ
१. आत्मनिर्भर भारत रोजगार अधिकृत वेबसाईट कोणती आहे?

https://www.epfindia.gov.in/

२. आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा उद्देश काय आहे?

समुद्ध आणि संपन्न भारत. Aatmanirbhar Bharat Rojgar Yojana सुरु करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे कोरोना च्या साथीच्या आजारामुळे गमावलेल्या लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे सर्वाना नोकरी मिळेल त्यामुळे भारताची अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

३. आत्मनिर्भर भारत रोजगाराचे फायदे काय?

गरीब, कर्मचारी, हॉटेल आणि वस्रोद्योग संबंधित साडेचार कोटी कर्मचाऱ्यांना फायदा
आर्थिक पॅकेज कॉटेज उद्योग, लघु उद्योग, MSME आहे यांच्यामुळे कोट्यवधी लोकांना कामाचे साधन आहे आत्मनिर्भर भारत रोजगार योजना

४. आत्मनिर्भर भारत रोजगाराचे ५ स्तंभ कोणते आहे?

पायाभूत सुविधा
अर्थव्यवस्था
मागणी
प्रणाली
लोकसंख्या

2 thoughts on “Online Apply Aatmanirbhar Bharat Rojgar Yojana 2021-Allpmmodiyojana”

Leave a Comment